सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू; शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू; शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड, दि. १४ जून :– सिल्लोड तालुक्यात अस्मानी संकट कोसळले असून विजेच्या धक्क्यातून चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सारोळा येथील रोहित राजू काकडे व यश राजू काकडे, पिंपळदरी येथील शिवा सतीश गव्हाणे तसेच मोढा येथील शेतकरी महिला रंजना बापू शिंदे हे आपल्या शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने जागीच मृत्युमुखी पडले.

या घटनेत काही शेतकऱ्यांची पाळीव जनावरेही मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनांची माहिती मिळताच सिल्लोडचे तहसीलदार यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी स्थानिक पातळीवरून करण्यात आली आहे.

खरीप हंगाम तोंडावर असून शेतकरी बांधव शेतातील कामांमध्ये व्यग्र आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की, हवामान बदलांची नोंद ठेवत योग्य खबरदारी घ्यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येतील.

मृत्यू झालेल्या शेतकरी बांधवांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.