विज पडून बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आमदार अब्दुल सत्तार यांची भेट – शासन तुमच्या पाठीशी आहे!

विज पडून बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आमदार अब्दुल सत्तार यांची भेट – शासन तुमच्या पाठीशी आहे!
विज पडून बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आमदार अब्दुल सत्तार यांची भेट – शासन तुमच्या पाठीशी आहे!

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड तालुका(प्रतिनिधी) दि १५ जून :- सोमवारी दुपारी सिल्लोड आणि सोयगाव परिसरात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीत विजेच्या धक्क्याने सिल्लोड तालुक्यातील चार नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सारोळा येथील रोहित आणि यश राजू काकडे हे दोन भाऊ, पिंपळदरी येथील शिवाजी सतीश गव्हाणे आणि मोढा बुद्रुक येथील रंजना बापूराव शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय आसडी येथे सुमित्रा चंदू सोनवणे या महिलेचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.

या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मृतांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत शासन संकटाच्या काळात त्यांच्या सोबत आहे, असा विश्वास दिला.

शोकाकुल वातावरणात सत्तार यांनी आपले दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या आत्म्यास शांती लाभो अशी श्रद्धांजली वाहिली.

तसेच, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. कोणताही नुकसानग्रस्त कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.