पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग; मृग नक्षत्र लागलं तरी...!

पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग; मृग नक्षत्र लागलं तरी...!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ जून:- महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली असली, तरी यंदा हवामानाचा लहरीपणा पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरतोय. मे महिन्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली, पण त्यानंतर पुन्हा कोरडं वातावरण असल्यामुळे पेरणीचा मुहूर्त नेमका कधी धरायचा यावर संभ्रम आहे.

सध्या मृग नक्षत्र सुरू झालं असून, परंपरेनुसार या काळात पावसाची चाहूल लागते. मात्र यंदा अजून पावसाला सुरवात झालेली नाही. काही ठिकाणी शेतकरी खतं, बियाणं गोळा करून ठेवत आहेत, तर काहींनी सुरुवातीची पेरणीही करून टाकली आहे. मात्र पावसाच्या प्रतीक्षेत ही पेरणी वाया जाण्याची भीतीही शेतकऱ्यांच्या मनात आहे.

जिल्हा कृषी विभागाच्या मते, १० ते १५ जूनदरम्यान पावसाची शक्यता असून त्यानुसार शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी. मात्र, याआधी पेरणी केल्यास बी जमिनीत खराब होण्याचा धोका आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे

.