१७ मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातील खासदारांचा भक्कम पाठिंबा!

महाराष्ट्र वाणी न्युज
मोझरी (जि. अमरावती), दि. १४ जून – जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांच्या १७ मागण्यांसाठी मोझरी (अमरावती) येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विविध पक्षांचे खासदार बच्चू कडू यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.
आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर (धाराशिव), निलेश लंके व फौजिया खान (राज्यसभा), डॉ. कल्याण काळे (जालना), बजरंग बाप्पा सोनावणे (बीड), विशाल पाटील (सांगली), रवींद्र चव्हाण (नांदेड), अमर काळे (वर्धा), भास्कर भगरे (दिंडोरी), संजय जाधव (परभणी), राजाभाऊ वाजे (नाशिक), अमोल कोल्हे (शिरूर), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), अनंतराव गुढे (अमरावती), उन्मेष पाटील (जळगाव), गोवाल पाडवी (नंदुरबार), संजय देशमुख (यवतमाळ), प्रणिती शिंदे (सोलापूर), प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर) आणि सुप्रिया सुळे (बारामती) यांचा समावेश आहे.
"बैठकीचं राजकारण नको, आम्हाला ठोस निर्णय हवेत," अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सदर आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या खासदारांकडूनही होत आहे.