“भाजपच्या पायऱ्या चढलात, शिंदेसेनेच्या कार्यालयातही जा” – केणेकरांचा टोला; दानवे म्हणाले, ‘केणेकरांनी हा उपदेश त्यांच्या नेत्यांना द्यावा’

“भाजपच्या पायऱ्या चढलात, शिंदेसेनेच्या कार्यालयातही जा” – केणेकरांचा टोला; दानवे म्हणाले, ‘केणेकरांनी हा उपदेश त्यांच्या नेत्यांना द्यावा’

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि७ जून :- राज्यात ठाकरे गटाने 'क्या हुआ तेरा वादा' या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ५ जून रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर घोषणाबाजी करत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले.

या घटनेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले, "मी असतो तर दानवेंना भाजप कार्यालयाच्या पायऱ्याही चढू दिल्या नसत्या. सरकारविरोधात निवेदन द्यायचं असेल तर ते प्रशासनाला द्या. शिंदेसेनेच्या कार्यालयातही निवेदन द्या आणि दाखवून द्या."

यानंतर अंबादास दानवे यांनी केणेकरांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “आम्ही कुठे आंदोलन करावं हे ठरवणं आमचं काम आहे. केणेकरांनी आम्हाला शिकवण्यापेक्षा, हा उपदेश त्यांच्या पक्षातील नेत्यांना करावा, ज्यांनी जनतेच्या आश्वासनांची वारंवार फसवणूक केली आहे.”

पुढे बोलताना दानवे म्हणाले, “आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने होत आहे. सरकारने दिलेली वचने पाळली नाहीत, म्हणूनच आम्ही आवाज उठवतो आहोत. त्यात कोणतीही दादागिरी नाही, ही लोकशाही आहे.”

दरम्यान, आमदार केणेकर यांनी या प्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिल्याचंही स्पष्ट केलं आहे. मात्र, ठाकरे गटाचं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं रहेत.