"क्या हुआ तेरा वादा?" आंदोलनातून महायुती सरकारला शिवसेनेचा जाब; मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा

"क्या हुआ तेरा वादा?" आंदोलनातून महायुती सरकारला शिवसेनेचा जाब; मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ जून :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत सरकारला थेट सवाल करत आहे. आज संभाजीनगरमधील भाजप कार्यालयात राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चा केली.

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, एक रुपयांत पीक विमा, वीजबिल माफी यांसारखी अनेक आश्वासने दिली होती. मात्र सरकार सत्तेत येऊन सहा वर्षे झाली तरीही ती आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याने, अनेक शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत, अशी गंभीर भूमिका शिवसेनेने मांडली.

या पार्श्वभूमीवर "क्या हुआ तेरा वादा?" या मोहिमेअंतर्गत शिवसेनेतर्फे आंदोलन सुरू आहे. ही माहिती मंत्री अतुल सावे यांना देण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, विजय वाघमारे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, महिला आघाडीच्या अशा दातार, सुकन्या भोसले, कविता मठपती, सुचेता आंबेकर व छाया देवराज आदी उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ने स्पष्ट केलं की ते महायुती सरकारमधील कोणत्याही मंत्र्याशी खुलेपणाने चर्चा करण्यास तयार आहेत, पण दिलेली आश्वासने पूर्ण होणे आवश्यक आहे.