फुलंब्रीजवळ भीषण अपघात; कार दोन तुकडे, तीन युवकांचा जागीच मृत्यू

फुलंब्रीजवळ भीषण अपघात; कार दोन तुकडे, तीन युवकांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र वाणी न्युज

फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर), दि. २५ जून :– फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना इग्निस कारचा भीषण अपघात झाला. कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने अपघात इतका भयंकर होता की संपूर्ण कार अक्षरशः दोन भागांत विभागली गेली. या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये रियान जमील शेख (वय १६) आणि अरफात आसिफ शेख (वय १७), दोघेही पिंपरी राजा (छ.संभाजीनगर) येथील रहिवासी आहेत. हे दोघे चुलत भाऊ असून जामा मस्जिद कमिटीचे हाजी अब्दुल जब्बार यांचे नातू होते. सय्यद मारुन माजिद, राहणार रोशन गेट, छत्रपती संभाजिनगर या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मारुन हा एटीसीचे गयास खान यांचे नातू होते अपघातानंतर त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

दोन कुटुंबातील तीन युवकांच्या मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातात शेख शरीफ, उजेर खान राहणार छत्रपती संभाजिनगर हे जखमी झाले त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे त्यांची प्रकृती बरी असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी फुलंब्री पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

क्षणात उजाडले आयुष्य... अश्रूंच्या सागरात बुडाले पिंपरी राजा गाव.