"गिट्टी-मुरुमात अडकलेले शेतकरी; शिवसेनेचा अभियंत्याला ४ दिवसांचा अल्टिमेटम – अन्यथा रस्त्यावर रण!"

"गिट्टी-मुरुमात अडकलेले शेतकरी; शिवसेनेचा अभियंत्याला ४ दिवसांचा अल्टिमेटम – अन्यथा रस्त्यावर रण!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

अकोला, दि. १६ जून :– प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरु असलेल्या घुसर-दोनवाडा व गुडधी-बाभुळगाव रस्त्यांच्या कामाची दुरवस्था, ढिसाळ नियोजन आणि निकृष्ट दर्जा पाहून शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी थेट अभियंत्याला ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. "रस्ते तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.

 शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास

खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते वाहून नेण्यात अडथळे येत आहेत. गिट्टी व मुरुमांमुळे बैलगाड्या उलटण्याच्या घटना समोर येत असून काही शेतकरी जखमीही झाले आहेत.

 पर्यायी रस्त्याचा अभाव, गॅपमध्ये मुरुमही नाही

सदर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सिमेंट रस्त्याच्या फटींमध्ये मुरुम न भरल्यामुळे वाहने अडखळत आहेत, तर रस्त्याच्या एका बाजूला फक्त गिट्टी टाकल्यामुळे वाहनचालकांना अपघातांचा धोका वाढला आहे.

 ४ दिवसात काम पूर्ण करा – अन्यथा तीव्र आंदोलन

"शेतकऱ्यांचे हाल थांबवा, अन्यथा शिवसेना उपनेते आ. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल," असा थेट इशारा दिला गेला.