शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याबद्दल बँकेला जाब – अंबादास दानवे यांची बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेत धडक

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याबद्दल बँकेला जाब – अंबादास दानवे यांची बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेत धडक
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याबद्दल बँकेला जाब – अंबादास दानवे यांची बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेत धडक

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २३ जून:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या पीक कर्ज समस्यांवर लक्ष केंद्रित करत 'बँकांची शाळा' या आंदोलनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज संभाजीनगर जिल्ह्यातील अग्रणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेला धडक दिली.

या भेटीदरम्यान अंबादास दानवे यांनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारण्याचे कारणे मागितली. त्यांनी स्पष्टपणे विचारले की,

आतापर्यंत किती पीक कर्ज अर्ज आले आहेत?

मंजूर अर्जांची संख्या किती?

किती अर्ज नामंजूर झाले आणि त्यामागची कारणे काय?

किती अर्ज प्रलंबित असून त्यामागील अडचणी काय आहेत?

यंदाच्या हंगामासाठी पीक कर्जाचे उद्दिष्ट किती असून आतापर्यंत त्याची किती पूर्ती झाली आहे?

किती शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर अथवा जुनी थकबाकी यामुळे कर्ज नाकारले गेले आहे?

शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहत दानवे यांनी बँक व्यवस्थापनास इशारा दिला की, शेतकऱ्यांना योग्य वेळी पीक कर्ज न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल.

याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य, किसानसेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, राजू इंगळे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनिता सोनवणे, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांचे उत्पादनक्षमता यासाठी पीक कर्ज अत्यंत आवश्यक असून, बँकांनी त्यांच्यावर अन्याय करू नये, ही भूमिका शिवसेना (उबाठा) पक्षाने घेतली आहे. या दौऱ्यानंतर अन्य जिल्ह्यांमध्येही 'बँकांची शाळा' उपक्रम अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत अंबादास दानवे यांनी दिले.