फेरफार तक्रारींवर नियंत्रण — महसूल विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश

फेरफार तक्रारींवर नियंत्रण — महसूल विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० जून:- जूनफेरफार प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूल यंत्रणेला सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. बिनआधार तक्रारींना आळा बसणार असून केवळ कायदेशीर तक्रारींचीच सुनावणी होणार आहे.

 सुधारित कार्यपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये:

 तक्रार पात्रतेची तपासणी:

जमिनीशी कायदेशीर संबंध नसलेल्या व्यक्तींच्या तक्रारी अमान्य ठरणार.

 फक्त वैध तक्रारींवरच सुनावणी:

फक्त हितसंबंधित अथवा नोंदणीमध्ये सहभागी असलेल्यांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या जातील.

 बिनआधार तक्रारींवर कारवाई:

चुकीच्या तक्रारी करून प्रक्रिया खोळंबवणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होणार. अशा प्रकरणांची नोंद वरिष्ठ कार्यालयाला अहवालाद्वारे दिली जाणार.

 जिल्हाधिकाऱ्यांचे वक्तव्य:

"सुधारित कार्यपद्धतीमुळे फेरफार प्रक्रिया अधिक प्रभावी आणि कायदेशीरदृष्ट्या बळकट होईल. नागरिकांना वेळेत व अचूक सेवा मिळणार असून महसूल विभागातील पारदर्शकता वाढेल." — जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 महसूल अधिकाऱ्यांना सूचना:

सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी सुधारित कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. कोणतेही फेरफार प्रलंबित ठेवू नये. अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 #फेरफार #जिल्हाधिकारी #महसूलविभाग #ईफेरफार #छत्रपतिसंभाजीनगर #DigitalGovernance #MaharashtraNews