मनपाच्या वतीने जालान नगर येथील नागरिकांना नुकसान भरपाई
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.२१ जुलै :- जालान नगर रेल्वेस्टेशन येथील नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने आज नुकसान भरपाई देण्यात आली.
दिनांक १० जून २०२४ रोजी जालान नगर येथे महानगरपालिकेची १४०० मिमी व्यासाची एक्सप्रेस जलवाहिनी फुटली होती.यामुळे या परिसरातील लगतच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते.या मालमत्ता धारकांनी महानगरपालकीकडे नुकसान भरपाई ची मागणी केली होती.
या अनुषंगाने सदर नुकसान भरपाई अदा करण्यासाठी मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मान्यतेनुसार कार्यप्रणाली निश्चित करण्यात येऊन एकूण ११ नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
आज मनपा मुख्यालय येथे मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विशाखा रॉय यांना नुकसान भरपाई चा धनादेश देण्यात आला.यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे,लेखा अधिकारी संजय कोलते यांची उपस्थिती होती.