शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शिवसेनेचा आवाज बुलंद! जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव, दि. १३ जून (प्रतीनीधी):- शेतकऱ्यांच्या अडचणी आणि विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा यांच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपासून ते कर्जमाफी, हमीभाव आणि विविध शासकीय योजनांच्या लाभांपर्यंत अनेक मागण्यांचा यात समावेश होता.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, सरसकट कर्जमाफी, तसेच शेतकी संघाच्या ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ३ हजार क्विंटलवरून १० हजार क्विंटलपर्यंत वाढवावे, अशीही ठाम भूमिका मांडण्यात आली.
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे आठ महिन्यांपासून थकीत लाभ लाभार्थ्यांना त्वरित द्यावेत, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशा जनहिताच्या विविध मागण्या निवेदनात नमूद होत्या.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगर प्रमुख शरद तायडे, वैशालीताई सूर्यवंशी, भाऊसाहेब सोनवणे, संतोष पाटील, पियुष गांधी, जाकिर पठाण, प्रशांत सुरळकर, प्रमोद घुगे, किरण भावसार, विजय बांदल, सतीश मोरे, दीपक पवार, छोटू कोळी, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, सचिन चौधरी, विजय राठोड यांनी केले.
शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला