"पोटनिवडणुकीत दणदणीत विजय!‘आप’चं देशभरात पुनरागमन, महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण!

"पोटनिवडणुकीत दणदणीत विजय!‘आप’चं देशभरात पुनरागमन, महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण!
"पोटनिवडणुकीत दणदणीत विजय!‘आप’चं देशभरात पुनरागमन, महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण!

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे, २३ जून (प्रतिनिधी) :– देशभरातील पाच पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, आम आदमी पार्टीने गुजरात आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवून राजकीय वर्तुळात आपलं बळ पुन्हा अधोरेखित केलं आहे. या निकालांनी देशभरात ‘आप’चा नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, महाराष्ट्रातही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लहर निर्माण झाली आहे.

गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघात गोपाल इटालिया यांनी तब्बल १७,५८१ मताधिक्याने विजय मिळवला, तर पंजाबमधील लुधियाना मतदारसंघात संजीव अरोरा यांनी १०,५४८ मतांनी बाजी मारली. या दोन्ही ठिकाणी ‘आप’ला गेल्या निवडणुकांच्या तुलनेत दुप्पट मताधिक्य मिळालं हे विशेष उल्लेखनीय आहे.

गुजरातसारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘आप’चे उमेदवार विजयी होणे ही केवळ राजकीय यशाची गोष्ट नसून, जनतेचा ‘आप’वर असलेला विश्वासही दाखवते. विशेष म्हणजे, विसावदरमध्ये काँग्रेसनेही ‘आप’विरोधात उमेदवार उभा केला होता, मात्र जनतेने पुन्हा एकदा ‘आप’ला पसंती दिली.

पंजाबमध्ये भाजप, काँग्रेस आणि अकाली दल अशा अनेक पक्षांशी चौरंगी लढत देत ‘आप’ने विजय मिळवला. हा निकाल पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीच्या कामगिरीवर जनतेने समाधानाचा शिक्का उमटवल्याचा पुरावा आहे.

“काँग्रेस आणि भाजप वेळोवेळी ‘आप’ संपल्याचे भाकीत करतात. मात्र प्रत्येक वेळी आम आदमी पार्टी नव्याने उभारी घेते आहे. हीच खरी लोकशाहीतली जनआंदोलनाची ताकद आहे,” असं महाराष्ट्रातील ‘आप’ नेत्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचे सहप्रभारी असलेले गोपाल इटालिया विजयी झाल्यामुळे राज्यातील ‘आप’ कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी ‘आप’च्या विचारधारेस पाठिंबा मिळत असल्याचेही पक्षाने अधोरेखित केले.

दरम्यान, पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्थानकाजवळील मुख्यालयाबाहेर ‘आप’ कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.